Sunday, November 5, 2017

महाराष्ट्रातील जनरल नॉलेज

महाराष्ट्रातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇
महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 
👉 १ मे १९६०
महाराष्ट्राची राजधानी कोणती?
👉 मुंबई
महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?
👉 नागपूर
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?
👉 ६
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?
👉 ५
महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?
👉 ३६
महाराष्ट्रातील महानगरपालिका?
👉 २६
महाराष्ट्रातील नगरपालिका?
👉 २२२
महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?
👉 ७
महाराष्ट्रातील  जिल्हापरीषदा?
👉 ३४
महाराष्ट्रातील एकुण तालुके?
👉 ३५८
महाराष्ट्रातील पंचायत समित्या?
👉 ३५५
महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
👉 ११,२३,७४,३३३
स्त्री : पुरुष प्रमाण किती?
👉 ९२९ : १०००
महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?
👉 ८२.९१%
महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?
👉 मुंबई उपनगर (८९.९१% )
सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?
👉 नंदुरबार (६४.४% )
सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?
👉 रत्नागिरी
सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?
👉 मुंबई शहर
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 अहमदनगर
क्षेत्रफळाने लहान जिल्हा?
👉 मुंबई शहर
जास्त लोकसंख्येचा जिल्हा?
👉 ठाणे
कमी लोकसंख्येचा जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?
👉 ९३%
महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?
👉 आंबा
महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?
👉 मोठा बोंडारा
महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
👉 हारावत
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
👉 शेकरु
महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?
👉 मराठी
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?
👉 कळसुबाई (१६४६ मी.)
महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?
👉 गोदावरी
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
भारतातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇
सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?
👉 गंगानगर ( राजस्थान )
सर्वांत जास्त जिल्ह्यांचे राज्य?
👉 उत्तरप्रदेश
सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?
👉 मुंबई (१,८४,१४,२८८ )
सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?
👉 केरळ
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 गिरसप्पा धबधबा
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 ब्रह्यमपुत्रा
सर्वांत मोठी घुमट कोणती?
👉 गोल घुमट
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 थरचे वाळवंट
सर्वांत उंच पुतळा कोणता?
👉 गोमटेश्वर ( बाहुबली )
सर्वांत मोठे धरण कोणते?
👉 भाक्रा नांगल
सर्वांत उंच धरण कोणते?
👉 टिहरी
सर्वांत लांब धरण कोणते?
👉 हिराकुड
सर्वांत लांब बोगदा कोणता?
👉 जवाहर बोगदा
सर्वांत मोठे स्टेडियम कोणते?
👉 युवा भारती
सर्वांत उंच मनोरा कोणता?
👉 दुरदर्शन मनोरा
सर्वांत उंच झाड कोणते?
👉 देवदार
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 कच्छ
लोकसंख्येने मोठा जिल्हा?
👉 ठाणे
सर्वाधिक पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
जगाचे जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 सहारा ( आफ्रिका )
सर्वांत मोठे बेट कोणते?
👉 ग्रीनॅलंड
सर्वाधिक लोकसंख्येचा देश?
👉 चीन
क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?
👉 रशिया
सर्वांत मोठा खंड कोणता?
👉 आशिया
सर्वांत मोठी गर्ता कोणती?
👉 मरियना
सर्वांत मोठा पक्षी कोणता?
👉 शहाम्रुग
सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?
👉 सुंदरबन
सर्वांत मोठा पुतळा कोणता?
👉 स्टॅचु ऑफ लिबर्टी
सर्वांत मोठी नदी कोणती?
👉 अॅमेझॉन
सर्वांत मोठे बंदर कोणते?
👉 सिडनी
सर्वांत मोठा महासागर कोणता?
👉 पॅसिफिक महासागर
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद ( दिल्ली )
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 व्हेनेझुएला
सर्वांत लहान खंड कोणता?
👉 ऑस्ट्रेलिया
सर्वांत लहान महासागर कोणता?
👉 आर्क्टिक महासागर
सर्वांत लहान पक्षी कोणता?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लहान दिवस कोणता?
👉 २२ डिसेंबर
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 नाईल
सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम ( मेघालय )
सर्वांत जलद उडणारा पक्षी?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?
👉 मलाक्काची सामुद्रधुनी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Ref. WhatsApp

Tuesday, October 31, 2017

Friday, October 20, 2017

Genius

In life when you see a pattern or a habit forming ... then you should think about that very carefully ... genius is about knowing when to stop

Tuesday, September 12, 2017

Motivational Career Guidance

कामाची लाज वाटणं हा तरुण मुलामुलींचा पहिला दोष. इच्छाशक्ती कमी आणि मेहनतीचा कंटाळा हा दुसरा मोठा दोष आहे. सगळ्यांना भरपूर पॅकेज देणारं, बिनकष्टाचं करिअर हवंय. सगळे गर्दीत, इंजिनिअरिंगच्या रांगेत उभे. का उभे? तर तिथं सगळेच जातात म्हणून आपणही जायचं. नवीन काही सुचत नाही, कुठल्याच विषयाची पुरेशी माहिती नाही, अभ्यास नाही, वाचन नाही, इंग्रजीची भीती वाटतेच आणि मराठीत धड काही बोलता येत नाही. आपण जे शिकतो, त्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या माणसांची नावं सांगता येत नाही. भविष्यातल्या बदलांचा अंदाज तर शून्यच. परिणाम काय? नैराश्य, हताशा आणि पैशाचा चक्काचूर.


दरवर्षी साधारणपणे मार्च महिन्यात आमचा करिअर काऊन्सेलिंगचा हंगाम सुरू होतो. यावर्षीही झाला. मी यावर्षी जवळपास एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना भेटलो आणि त्यांच्या पालकांशीदेखील मी चर्चा केली. आपल्या मुलांनी संधी असूनसुद्धा अनेक गोष्टी पाहिलेल्या किंवा ऐकलेल्यासुद्धा नाहीत, असा मला अनुभव आला. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपण साध्या साध्या माहितीपासूनसुद्धा किती दूर आहोत, याची दुर्दैवी जाणीव झाली.
उदाहरणादाखल मी काही गोष्टी पालकांसमोर मांडू इच्छितो -
१) मलाला युसुफजाई? - कोण ते माहीत नाही.
२) मेक इन इंडिया हे प्रदर्शन? - काय होते, कशासाठी होते हे माहीत नाही.
३) कोणत्याही १० पुस्तकांची नावं (तुम्ही वाचलेल्या किंवा न वाचलेल्या) - सांगता आली नाहीत.
४) भारतातील एकूण राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश यांची नावं? - सांगता आली नाहीत.
५) बॅँकेत डिमाण्ड ड्राफ्ट कसा काढतात? - माहीत नाही.
६) भारताचं चीनशी नेमकं भांडण आहे तरी काय? - माहीत नाही.
७) इनव्हर्टर नेमकं कसं काम करतो? - माहीत नाही.
८) आॅनलाइन मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांना नफा मिळतो का? किंवा कसा मिळतो? - माहीत नाही.
९) चार्टर्ड अकाउंटंटचं नेमकं काम काय असतं? - माहीत नाही.
१०) माहितीचा अधिकार म्हणजे काय? - माहीत नाही.
११) काळा पैसा म्हणजे काय? - माहीत नाही.
१२) कोणत्याही १० आजारांची नावं? - सांगता येत नाहीत.
१३) वायरलेस चार्जरमध्ये कोणतं तंत्र वापरलं आहे? - माहीत नाही.
१४) अ‍ॅण्ड्रॉइड म्हणजे काय? - माहीत नाही.
१५) जगातील सर्वात श्रीमंत अशा कोणत्याही १० व्यक्ती? - सांगता आल्या नाहीत.
हे मी जे सांगतोय ते १०० टक्के सत्य आहे, एकही शब्द खोटा नाही. यादी खूप मोठी आहे आणि आपल्या समजुतींना मोठे हादरे देणारी आहे. मग मुलं करिअरचे निर्णय घेतात तरी कसे? पालक आणि शिक्षक नेमकं करतात तरी काय? मुलं काहीही नवीन वाचत नाहीत, त्यांची भाषा शुद्ध नाही, उच्चार स्पष्ट नाहीत, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते नीट मांडता येत नाही, एखाद्या गोष्टीवर त्यांना त्यांचं मतच नाही. अशा मुलांचा टिकाव स्पर्धेत लागणार आहे का? मुलांना जगातल्या अनेक गोष्टी माहितीच नाहीत, याची माहिती पालकांना नाही. हे सगळं फार धक्कादायक आहे. निराशाजनक आहे..
आला विद्यार्थी की करा अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट हा प्रकार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्यच अंधारात टाकणारा आहे. माझ्या परिचयातल्या एका मुलीला एका ख्यातकीर्त तज्ज्ञांनी तू टेलरिंग किंवा ब्यूटिपार्लरचा कोर्स केलेला बरा, त्यापेक्षा अधिक काही तुला झेपणार नाही असं एकदम ठासून सांगितलं. आश्चर्य म्हणजे तीच मुलगी एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजीमध्ये तिच्या कॉलेजात दुसरी आली. आणि असा दुर्दैवी प्रकार मोठ्या शहरांमध्ये चालत असेल, तर महाराष्ट्रातल्या निमशहरी किंवा ग्रामीण भागात तर दैनाच उडाली असेल..
अंगठ्याच्या ठशावरून करिअर गायडन्स करणाऱ्या व्यक्तींची संख्या पुण्यात चांगलीच फोफावतीय. करिअरविषयीचा निर्णय अशाप्रकारे बोटांचे ठसे पाहून सांगण्याचा उद्योग ‘अ‍ॅप्टीट्यूड टेस्टिंग’च्या नावानं काही लोक करतात, याचं दु:ख मोठं आहे. ‘जा तू इंजिनिअरिंगला’ किंवा ‘कर तू सीए’ असा एका वाक्यात संपणारा करिअर गायडन्सचा उद्योग मी अनेक ठिकाणी पाहतो, मला त्या पालकांची कीव येते. अ‍ॅप्टीट्यूड हा एक अतिशय गहन अभ्यासाचा विषय आहे. कुणीही उठावं आणि स्वत:ला करिअर गायडन्स तज्ज्ञ म्हणवून घ्यावं, इतकं ते सोपं नाही. अर्धवट माहिती, अपुरं ज्ञान, क्र ेझ आणि कमी कष्टात दणदणीत पॅकेज मिळवण्याचा मोह या गोष्टींमध्ये आजचा विद्यार्थी अडकला आहे. त्याचे पालकही याच चक्र व्यूहात अडकले आहेत. त्यांना नीट मार्गदर्शन मिळालं नाही तर त्या मुलाचं पूर्ण करिअरच धोक्यात येतं आणि शिवाय आईवडिलांचं मोठं आर्थिक नुकसानही होतं.
अनेक करिअर काऊन्सेलर्सना स्वत:लाच आयआयटी, मेडिकल, चार्टर्ड अकाउन्टन्सी या क्षेत्रांबद्दल इतकं प्रचंड आकर्षण असतं की, ते जो येईल त्याला हेच २-३ पर्याय सुचवत असतात. समाजातली बेरोजगारी आणि सुशिक्षित तरुणांमधलं नैराश्य वाढायला याच गोष्टी कारणीभूत असतात. अनेक कोचिंग क्लासेस स्वत:चा व्यवसाय वाढावा म्हणून विद्यार्थ्यांच्या कुठल्यातरी प्रवेश परीक्षा घेऊन पालकांना वाटेल ती चकचकीत आश्वासनं द्यायला अजिबात मागे-पुढे पाहत नाहीत. दहावीनंतर असा चुकीचा गायडन्स घेऊन पुढचा रस्ता पकडणारा विद्यार्थी बारावीला बरोबर खड्ड्यात पडतोच. तोपर्यंत कॉलेजची फी, कोचिंग क्लासची फी, टू व्हीलर, मोबाइल फोन, लॅपटॉप, पर्सनल ट्यूशन, वह्यापुस्तकं या व अशा अनेक गोष्टींवर कमीत कमी ६-७ लाख रुपयांचा अवाढव्य खर्च करून पालकांना आधीच दरदरून घाम फुटलेला असतो. तेल गेलं, तूपही गेलं आणि शेवटी धुपाटणंसुद्धा गेलं अशी पालकांची अवस्था होते. या अवस्थेतलं गांभीर्य नीट समजून घ्यायला पाहिजे.
शिक्षण आता पूर्वीसारखं साचेबद्ध राहिलेलं नाही. ते आता खरोखरच व्यापक झालं आहे. नव्या संधी उपलब्ध होत आहेत. भविष्यातही अनेक नवी दारं उघडतीलच. लेदर प्रोसेसिंगपासून ते फूड कॉर्नर चालवण्यापर्यंत आणि सोने-चांदीवरील कारागिरीपासून ते पिठाच्या गिरणीपर्यंत जवळपास १० हजारांहून अधिक उद्योगमार्ग आणि योजना उपलब्ध असतानाही मुलंमुली नैराश्यात जातातच कशी आणि आत्महत्या करतातच कशी हा प्रश्न कुणालाच कसा काय पडत नाही? स्वत:विषयीच्या वाढलेल्या खोट्या आणि बेगडी अपेक्षा हे या समस्येचं खरं कारण आहे. अन्यथा कुणी विद्यार्थी केवळ नापास झाला म्हणून आत्महत्या करेल का? - हा साधा सरळ प्रश्न आहे.
कॉस्मेटिक्स मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, टाउनशिप मॅनेजमेंट, वॉटर हार्वेस्टिंग, अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स मॅनेजमेंट, कोल्ड स्टोरेज मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांमध्ये आभाळभर संधी असतानाही विद्यार्थ्यांना नैराश्य का बरं यावं? अपुरी आणि अर्धवट माहिती, चकचकीत आयुष्याची क्र ेझ, चुकीचे आदर्श, चटकन भरमसाठ पॅकेजेस मिळवण्याचा हव्यास हे नैराश्येचं खरं कारण..
मी तुम्हाला एक गंमत सांगतो..
पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर पोरवाल सायकल्सच्या बाहेर काही मसाजवाले बसतात, हे मी पाहिलं होतं. मी गेलो. बेताची उंची, अंगात कॉटनचा शर्ट, काचा मारलेलं धोतर, पायात स्लीपर आणि हातात टॉवेल अशा पोशाखाची दोन-तीन माणसं बसलेली होती. जॉनी वॉकरच्या मालिश तेल मालिश गाण्यात त्याच्याकडे निदान एक लाकडी खुर्ची तरी होती, इकडे तर सगळा फुटपाथवरच कारभार. मी त्यांच्यातल्या एका मुलाला भेटलो. आंध्र प्रदेशातून हा मुलगा पुण्यात आला. सुरुवातीला मजूर, हमाल, कष्टकरी माणसांचे हातपाय रगडून द्यायचा. मग मार्केटयार्ड ते लक्ष्मीरोड अशी प्रगती झाली. जागा भाडं नाही, विजबिल नाही, कुठलीही साधनं नाहीत. एक साधी तेलाची बाटली आणि एक स्वच्छ टॉवेल. बास. भांडवल काहीही नाही. बंद दुकानाच्या पायरीवर व्यवसाय चालतो. पण, कौशल्य आहे आणि मेहनतही आहे. अतिशय मितभाषी असावं लागतं. बोलणं कमी अन् काम जास्त करावं लागतं. अर्थप्राप्ती उत्तम होते. खेळाडू, दुकानदार, व्यावसायिक, अर्धांगवायू रुग्ण अशा अनेक प्रकारच्या व्यक्ती मालिशकरिता येतात. अगदीच नाही म्हटलं तरी रोज रात्री ९.३० ते १२.३० यावेळात बिनभांडवली ८०० ते १२०० रुपये मिळतात. साधारण मासिक अर्थप्राप्ती २५ ते ४० हजारांच्या दरम्यान होते. वर्षाकाठी साधारण पाच लाख रुपये मिळतात. काही लोकांच्या घरी जाऊन मालिश करायची असल्यास ५०० ते १००० रुपये घेतात. त्याचे साधारण वर्षाकाठी दीड ते दोन लाख रुपये मिळतात.
www.kotapure.com

*काय वाईट आहे? आणि काय गैर आहे?*
आपण जरा कल्पना करून पाहू..
एखाद्या शहराच्या महापालिकेच्या शाळांमध्ये पहाटे ५.३० ते ८.३० योगासनं व सूर्यनमस्कार वर्ग चालतो आहे. त्या शहरातले इयत्ता बारावीनंतर योगासनं व सूर्यनमस्कार प्रशिक्षण घेतलेले महापालिकेच्या शाळांमधून शिकलेले १००० विद्यार्थी आता सूर्यनमस्कार प्रशिक्षक बनले आहेत. आर्थिक प्रगती उत्तम. सायंकाळी महापालिकेच्या शाळांच्या मैदानांवर हास्ययोग क्लब चालतो. त्या शहरातील १००० महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी हास्ययोग प्रशिक्षित असून, त्यांच्यामार्फत हे वर्ग चालवले जातात. महापालिका शाळांच्या मैदानावर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सायकल क्लब चालतात. सुरक्षित वातावरणात सायकल चालवून व्यायाम व खेळ या दोन्हीचाही आनंद शहरातले नागरिक घेत आहेत. शहरातले विविध महाविद्यालयांमध्ये शिकणारे १००० विद्यार्थी हे क्लब्ज चालवतात. त्याच शहरात महापालिकांच्या शाळांमध्ये काम करणारे ३५० समुपदेशक आहेत. हे समुपदेशक प्रत्येक आठवड्यातून दोन दिवस प्रौढांकरिता तणावमुक्त होण्यासाठी ध्यान शिबिर घेतात. १०० शाळांमध्ये ही शिबिरे चालतात. ही शिबिरे सशुल्क आहेत, त्यामुळे महापालिकेतील समुपदेशकांना उत्तम मानधन मिळत आहे.
कल्पनेतलं हे चित्र पाहायला कसं वाटतंय? नक्कीच फार आशादायक चित्र असेल. पण अशी उद्योगव्यवसाय आयडिया कुणाला सुचते का?
या सगळ्या प्रगतीच्या संधी नाहीत का? आपल्या समाजातील बेरोजगारी कमी करण्यासाठीचा हा सर्वात जवळचा उपाय आहे. नव्या संधी शोधणं, नवे रोजगार विकसित करणं आणि त्या व्यवसायांमधील उद्योजक-व्यावसायिक तयार करणं हा मार्ग जास्त विश्वासार्ह आहे. स्वत:च्या प्रामाणिक कष्टांना चांगली फळं यायला लागली की शॉर्टकट्स मारावे लागत नाहीत. कारण, स्वत:ची प्रगती करण्याचा मार्ग चांगला स्पष्ट झालेला असतो. मराठी मुला-मुलींनी कामाची लाज वाटणं सोडून दिलं तर त्यांचं कल्याण होईल. आयुष्याचं भलं होईल. पानाच्या गादीवर बसून सिगारेटी-गुटखा-मावा विकणं, आॅनलाइन लॉटरीचे उद्योग करणं किंवा तत्सम टुकार कामं करण्यापेक्षा सेवाक्षेत्रात यावं आणि सचोटीनं मोठं व्हावं. खरंतर इच्छाशक्ती आणि मेहनतीचा कंटाळा हा मोठा दोष आहे. शिक्षण आवश्यक तर आहेच, पण ते योग्य दिशा देणारं आणि प्रगती करणारं हवं. योग्य करिअर निवडण्याकरिता करिअर काऊन्सेलिंग अपरिहार्य आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून माझं विविध विद्यार्थ्यांशी बोलणं होत होतं, चर्चा व्हायच्या. इमेल संवाद सुरू होते. अजूनही मी ईमेल्स वाचतोय, मुलांचे विचार पाहतोय. काम सुरू आहे. जवळपास १५०० विद्यार्थ्यांशी मी बोललो, त्यांच्या मनातले करिअरबद्दलचे विचार जाणून घेतले.
अनेक नकारात्मक आणि निराशाजनक धक्के बसले.
या मुला-मुलींपैकी जवळपास ८५ टक्केविद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग हेच करिअर निवडायचं ठरवलंय. पण यांच्यापैकी जवळपास ७० टक्के विद्यार्थ्यांना आतापर्यंत कधीही ५५-६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेले नाहीत. खोलात जाऊन पाहिलं, मग लक्षात आलं की यातले अनेकजण वारंवार नापासही झालेले आहेत. अभ्यासाचा कंटाळा आहे, इंग्रजीची भीती आहे. शाळेतही नियमित जात नाहीत. मग या विद्यार्थ्यांकडून मी आणखी माहिती मिळवली. तेव्हा लक्षात आलं की, या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगविषयी काहीच माहिती नाहीय. आणि तरीही त्यांचं स्वप्न मात्र तेच आहे. यांना इंजिनिअरिंगच्या शाखा माहीत नाहीत, जगातली सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजेस, विद्यापीठं माहीत नाहीत, संशोधनांविषयी माहिती नाही, शास्त्रज्ञ माहीत नाहीत, पेटंट्स वगैरे तर ऐकूनही माहीत नाहीत. इंजिनिअरिंग करून पुढे काय करायचंय, याची दिशाही माहीत नाही. पण तरीही यांना इंजिनिअरिंगच करायचंय.
एकूणच परिस्थिती कठीण आहे. आता अशा मुला-मुलींकडून ते इंजिनिअर होतील आणि भारताला तांत्रिक महासत्ता करतील अशी अपेक्षा करणं म्हणजे प्लॅस्टिकच्या वेलीला खरा भोपळा लागण्याइतकं अशक्य आहे. पण मुलं आणि त्यांचे पालक हे दोघेही मृगजळाच्या मागे लागलेले असतात. त्यामुळे, वास्तविक परिस्थितीपासून ते हजारो कोस लांब असतात. हे आपल्या देशातलं चित्र असंच राहिलं तर येत्या काही वर्षांत रस्त्यावरच्या पानवाल्यापासून ते रिक्षावाला, दूधवाला, कॅब ड्रायव्हर या सगळ्या जागी इंजिनिअरिंग पदवीधरच दिसतील. जगातल्या सगळ्यात तरुण देशाची अंतर्गत अवस्था फार दयनीय होईल.
बुद्धिमत्ता, क्षमता, संशोधक वृत्ती हे जिथं महत्त्वाचं आहे, तिथं यातलं काहीच न पाहता केवळ आंधळेपणानं आणि इतरांशी तुलना करून करिअर करायला जाणं भविष्यात अत्यंत नुकसानकारक ठरणार आहे. गेली ७० वर्षे आपण विकसनशील देश या प्रतिमेतून बाहेर का पडलो नाही, याचं हेच कारण असण्याची दाट शक्यता आहे. काय करणार, सत्य तर नेहमीच कडवट असतं...

*गर्दीत जगायचं की वेगळ्या रस्त्यानं जायचं?*
काही मुलं मात्र वेगळीच असतात.वेगळा विचार करतात, नव्या वाटा त्यांना माहिती तरी असतात नाहीतर त्यांनी शोधलेल्या तरी असतात. अशा मुलांकडे पाहून मात्र त्यांचं फार कौतुक वाटतं. अशा मुलांचं प्रमाण कमी आहे हे खरं पण करिअर म्हणून त्यांना जे दिसतं, त्यांची करिअरची स्वप्न म्हणून ते जी वाट पाहतात, ते पहा. त्यांना नव्या जगात करिअर म्हणून ही कामं करायची आहेत असं काहीजण सांगतात. त्या यादीवर एक नुस्ती नजर घाला, आपल्यालाच एक वेगळीच नजर मिळते..

* इकोफ्रेंडली सिमेंट
* एक लाख तास चालणारा एलईडी बल्ब
* रस्त्यावरचा धूर आणि धूळ शोषून घेणारे अ‍ॅबसॉर्बर्स
* घाण न होणारं कापड
* बाहेरचं तापमान कंट्रोल करणारी वीट
* न झजिणारे टायर्स
* टेलिरंग प्रोग्रॅमर्स
* सोलर जनसेट्स
* भाजी ताजी ठेवणारा व्हेजिटेबल कुलर
* १०० तासांहून अधिक काळ चालणारी मोबाईल बॅटरी
* तीन मजली रस्ता
* प्रोजेक्टर टीव्ही
* देशभर फ्री कॉलिंग देणारी वायर्ड टेलिफोन यंत्रणा
* शाळांकरिता डिजिटल डेस्क
* कम्युनिकेशन व लॅपटॉप चं कॉम्बिनेशन असणारा टेलिटॉप
* मिल्क ब्लॉक्स
हे सगळं या मुलांना सुचतं तरी कुठून? या गोष्टी प्रत्येकालाच सुचणं आणि जमणं शक्यच नाही. असा विचार करणारी मुलं नक्कीच सामान्य नाहीत. त्यांच्या बुद्धिमत्तेचा दर्जा अत्यंत उत्तम आहे. या मुलांनी शालेय स्तरावरच्या तथाकथित कोणत्याही स्पर्धापरीक्षा दिलेल्या नाहीत, ही गोष्ट अनेक मुद्यांवर विचार करायला लावणारी आहे. या कुशाग्र बुद्धिमत्तेला संधी देणं आवश्यक आहे. त्यांना काही वेगळं मार्गदर्शन आवश्यक आहे. या स्वप्नांच्यामागे निश्चितच अभ्यास आहे, निरीक्षण आहे, भरपूर वाचन आहे, माहिती गोळा केलेली आहे. हे सगळं खूप सकारात्मक आहे. आता अशा मुलांना पालकांनी वेडगळ कल्पना-बोगस कल्पना असं म्हणून झटकणं मात्र चुकीचं आहे. बुद्धिमत्ता आणि क्षमता यांचा अजिबातच विचार न करता घेतलेलं शिक्षण तसं पहायला गेलं निरूपयोगीच ठरतं. कारण, ते तुम्हाला दिशाही देऊ शकत नाही आणि विचारांची श्रीमंतीही देत नाही.
जेवणाच्या ताटात केवळ समान संधी द्यायची म्हणून भाताएवढं मीठ किंवा मिठाएवढा भात कधीही वाढला जात नाही. ज्याचा त्याचा वकुब वेगळा! व्यक्तीनं तिच्या क्षमता आणि बुद्धीचा खरा उत्तम, नैतिक आणि संतुलित वापर करणं आणि तिला योग्य त्या क्षेत्रापर्यंत पोचवणं महत्वाचं आहे. बिनकष्टाचं करिअर होणार नाही आणि या जगात कुणीही नर्मदेतला गोटा नाही, हे पक्कं लक्षात ठेवा. टक्के-टोणपे खावेच लागणार आणि गर्दीतले धक्के तर बसणारच आहेत. गर्दीतच जगायचं की, वेगळा रस्ता निवडायचा हे आपल्यालाच ठरवावं लागणार आहे. स्पर्धेचं वास्तव जितक्या लवकर स्वीकाराल तेवढे अधिक यशस्वी व्हाल...

*अरे, अ‍ॅप्टीट्यूड म्हणजे काय?*

सकाळचीच गोष्ट. एकाचा फोन आला.
अरे, अ‍ॅप्टीट्यूड म्हणजे काय? ते सोप्या शब्दात सांग ना जरा. मी त्याला जे सांगितलं ते शेअर करतो. छत्रपतींच्या एका शब्दावर ज्यांनी अपार मेहनत घेऊन प्रतापगड उभा केला ते मोरोपंत पिंगळे किंवा रायगडाचं काम करणारे हिरोजी इंदुलकर म्हणजे बांधकामशास्त्रातलं अ‍ॅप्टीट्यूड. बसल्या बैठकीत एकटाकी गाणं लिहीणारे गदिमा म्हणजे शब्दरचनेतलं अ‍ॅप्टीट्यूड आणि त्याला तशीच बसल्या बैठकीत चाल लावणारे बाबूजी म्हणजे सूररचनेतलं अ‍ॅप्टीट्यूड. हजारो शस्त्रक्रिया अत्यंत अचूक करणारे डॉ.नीतू मांडके म्हणजे शल्यशास्त्रातलं अ‍ॅप्टीट्यूड. मनातल्या विचारांचा आणि अंतरंगाचा वेध घ्यायला शिकवणारे तेजज्ञान फाऊंडेशनचे सरश्री म्हणजे मानसिक प्रशिक्षणातलं अ‍ॅप्टीट्यूड. एका खोलीत कंपनी सुरू करून तिला जगातल्या सर्वोत्तम आयटी कंपनीपर्यंत नेणारे नारायण मूर्ती म्हणजे तंत्रज्ञान संसाधनातलं अ‍ॅप्टीट्यूड.
तो मला म्हणाला, अरे, हे फारच अशक्य आहे. या लेव्हलला जाणं सध्याच्या काळात जवळ पास अशक्य आहे. स्पर्धा बघ ना किती वाढलीय ते..
मी त्याला उत्तर दिलं, जर तुमचं अचूक अ‍ॅप्टीट्यूड तुम्हाला समजलं असेल तर स्पर्धेचा संबंधच नाही. स्वत:ला परफेक्टली ओळखलेल्या माणसाला स्पर्धेची भीती वाटण्याचं काही कारणच नाही. अंगभूत क्षमतेच्या जोरावर तो त्याचं स्थान निर्माण करण्यास सक्षम असतो. त्यानं कशाला घाबरायचं स्पर्धेला?
नैसर्गिक क्षमतेला पर्यायच नाहीय, असं म्हणायचंय का तुला? त्यानं विचारलं.
मीच म्हणतोय असं नाही. जगातल्या प्रत्येक क्षेत्रात टॉपला गेलेल्या प्रत्येकानं हेच आयुष्य जगलेलं आहे. त्यांना तर अप्टीट्यूडचा जिवंत अनुभवच आहे. स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

(लेखक - मोटिव्हेशनल ट्रेनर , करिअर कौन्सिलर आहेत.)
डॉ.प्रदीप सोनार,
9405859345, 866886766.
pvstapc@gmail.com
                     

Wednesday, June 28, 2017

स्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from steve jobs in marathi )

स्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from steve jobs in marathi )

स्टिव्ह जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते. त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड होती आणि याच कामासाठी त्यान स्वतःलाे वाहून घेतले होते. आयफोन, ‘आयपॉड’, ‘आयपॅड’ हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले. आज आपण स्टिव्ह जॉब्स याचे काही सिक्रेट नियम पाहणार आहोत. जे नियम वापरून स्टिव्ह जॉब्स घडला. तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हे नियम खूप कामी येतील.

1) तेच करा जे तुम्हाला करायला आवडते.(Do what you love to do.)

स्टिव्ह जॉब्स म्हणतो

“Do what you love to do. The only way to do great work is to love what you Do.”

मित्रांनो तुम्ही आज कुठले ही क्षेत्र घ्या, वरवर पाहता ते खूप सोप्पे वाटते. पण जसे जसे तुम्ही त्यात डीप मध्ये जाता तेंव्हा तुम्हाला कळते की त्या कामात खूप अडचणी आहेत. त्यात देखील खूप कौशल्य लागतात.अश्या वेळी जर तुम्हाला तुमच्या कामाचा प्रती उत्कटता नसेल, प्रेम नसेल तर तुम्ही त्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी ना तोंड देऊच शकणार नाही.

म्हणूनच अडचणी च्या वेळी तुमचं त्या कामाच्या प्रति किती आवड आहे हेच ठरवते की तुम्ही त्या क्षेत्रात रहाणार कि नाही. थोडक्यात जर तुम्हाला यशस्वी बनायचे असेल. तर तेच करा जे तुम्हाला करायला आवडते.

2)वेगळे विचार करा (think different)

स्टिव्ह म्हणतो

Better Be a pirate than to join navy. Be different

बराच वेळा आपण ते करतो जे सर्व लोक करत आहेत. आपण मळलेल्या वाटांवरच चालणे जास्ती पसंद करतो. कारण नव्या वेगळ्या वाट शोधणे आणि त्या वर चालणे आपल्याला असुरक्षित वाटते किंवा आपण भितो नवीण वाटेवर चालायला.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला जर ते मिळवायचे असेल जे कोणी आज पर्यंत मिळवले नसेल तर तुम्हाला हि ते करावं लागेल जे आज पर्यंत कोणी कधी केली नसेल. ईतर लोकांनी जे केलं, जी वाट शोधली त्याच वाटेवर तुम्ही गेलात तर तुम्ही देखील तिकडेच जाल जिकडे ते गेले. त्यात नाविन्य ते काय. म्हणून

Be Different, think different.

स्टिव्ह जॉब्स कॉम्प्युटर बनवायचा, मोबाईल इत्यादी अनेक गोष्टी तो हयातीत असताना अप्पल ने बनवले. या सर्व गोष्टी काय नवीन होत्या? अजिबात नाही, पण आपण बघतो अप्पल आणि बाकी कंपनीन मधील फरक. येथे वेगळा विचार म्हणजे नाविनच काही तरी केले पाहिजे असा होत नाही तर सगळे जे करतात त्याचा पेक्षा आपण वेगळे करायला पाहिजे. लक्षात ठेवा “विजेता वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात.”

3) पहिले पाऊल टाका (first step is hardest one, just take it)

एक व्यक्ती ने त्याचा देशाचे संपूर्ण भ्रमण केले होते ते देखील सायकल चालवत. या त्याचा पराक्रमा नंतर पत्रकाराने त्याची मुलाखत घेतली. त्या मुलाखती मध्ये त्यांनी त्या व्यक्तीला विचारले की तुम्हाला या प्रवासात सर्वात जास्ती कोणती गोष्ट अवघड वाटली. त्या वर त्या व्यक्तीचे उत्तर होते की घरचा उंबरटा ओलांडणे सर्वात आवघड वाटले. एखाद्या कामाची सुरुवात करणे हेच सर्वात महत्त्वाचे आणि अवघड काम असते.

या वर स्टिव्ह म्हणतो.
Sometimes the first step is hardest one. Just take it. Have the courage to follow your heart and intuition.

पहिले पाऊल टाकणे हेच कधी कधी सर्वात अवघड काम बनते, तेव्हा ते पाऊल टाका आणि अंतर्मनचे ऐका, ध्येर्य बाळगा. जेंव्हा तुम्ही पहिले पाऊल टाकता तेंव्हा तुम्हांला दुसरे पाऊल कुठे टाकायचे हे तुम्हांला लक्षात येईल.

4) सुरुवात लहान करा पण ध्येय मोठे ठेवा (start small, think big)

स्टिव्ह जॉब्स आणि त्याचा मित्र स्टिव्ह वॉझनिएक या दोघांनी अप्पल कंपनी ची स्थापना एका ग्यारेज मध्ये केली होती. त्यां दोघांना त्यांचा पहिला कॉम्प्युटर ‘अप्पल-1’ बनवण्या साठी 1000 डॉलर्स ची गरज होती ती त्या दोघांनी त्यांचा आवडत्या गोष्टी विकून मिळवल्या होत्या. आज तुम्हाला सांगायची गरज नाही की अप्पल कंपनी कुठे बाकी कंपनी च्या तुलनेत.

म्हणून स्टिव्ह म्हणतो

Don’t worry about too many things at once, just concentrate on one thing, start small , think big

एका वेळी खूप गोष्टींचा विचार करत बसू नका. सुरुवात लहान करा पण स्वप्न मोठे ठेवा.

5) नेहमी शिकत राहा (Learn continually.)

मित्रांनो तुम्हाला वॉरेन बफे तर माहिती असतीलच, त्यांना शेर मार्केट मध्ये गुरूंचे गुरुं मानले जाते. ते दिवसात 600 ते 1000 पेज वाचन करतात. ते जवळपास त्यांचा 80% दिवसाचा वेळ हे वाचनात घालवतात. ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांचा यादीत 2 किंवा 3 सातत्याने येतात. अश्या माणसाला देखील नाविन शिकण्याची आवश्यकता वाटते. तर तुम्हाला आणि मला आणखी किती शिकायचे आहे विचार करा.

यासाठी स्टिव्ह जॉब्स देखील म्हणतो

Learn continually. There’s always one more things to Learn.

निरंतर शिकत राहा. कितीही शिकले तरी आणखी एखादी गोष्ट शिकण्या साठी नक्की असते. जगातील सर्व यशस्वी लोकांना घ्या. ते त्यांचा वेळ हे नाविन काही तरी शिकण्यात ते जास्ती खर्च करत असतात.

6) फक्त पैशांसाठी नका करू(Don’t do it for money)

हा नियम माझा खूप आवडीचा नियम आहे. कुठलीही गोष्ट फक्त पैसे कमावणे एवढंच उद्दिष्ट समोर ठेवून बनवण्यात अली असेल, ती गोष्ट फार काळ टिकू शकत नाही. म्हणून तुम्ही तुमचे ध्येय ठेवताना फक्त पैसे कमावणे एवढेच नका ठेवू. या गोष्टीला प्रमाण म्हणून तुम्ही कोणती ही मोठी कंपनी घ्या त्या कंपनी चे ध्येय हे पैसे कमावण्याचा वर आहे.

या साठी अप्पल कंपणीचेच ऊदाहरण घ्या. अप्पल मध्ये बनवले गेलेले सर्व प्रॉडक्ट्स नी जगात क्रांती आणली. जसे अप्पल कॉम्प्युटर पर्सनल कॉम्प्युटर विश्वात क्रांती आणली आणि i-phone आले आणि मोबाईल विश्वात क्रांती अली. इत्यादी.

या साठी स्टिव्ह जॉब्स म्हणतो.

Don’t do it for the money. Choose a job you love., And you will never have to work a day in your life.

म्हणजेच पैसा साठी काम नका करू. फक्त आवडीचे काम शोधा आणि तुम्हाला आयुष्यात कधी काम करायची गरज पडणार नाही. स्टिव्ह जॉब्स 25 वर्षाचा होता तेंव्हा त्याचा कडे 100 मिलीयन डॉलर्स एवढी संपत्ती होती. पण त्याने कुठलीही गोष्ट फक्त पैसे कमवण्या साठी केलं नव्हतं, त्याला आपल्या अविष्काराणी जग बदलायचं होत.

7) भाऊ गर्दीत स्वतःचा आवाज दाबू नका (Don’t let the noise of other’s opinion drown out your own inner voice.)

जगात सर्वात मोठी गोष्ट जी माणसाला यशा पासून दूर ठेवते ती म्हणजे लोक काय म्हणतील. आपण बऱ्याच वेळा एखादे काम, लोक काय म्हणतील हाच विचार करून करत नाही. लोक आपल्या प्रति काय विचार करतात हे तुम्हाला विचार करायची काहीच गरज नसते. लोकांचा या भाऊ गर्दीत तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा आवाज हरवू नका देऊ.

नेहमी मनातले करा, ज्यात तुमची आवड असेल ते करा. अगदी मन मोकळे बिंदास कोणाची तमा न बाळगता. आणि लोकांन साठी हे हिंदी गाणे म्हणा ‘कुछ तो लोग कहेंगे! लोगोका काम हे केहना’.

8) दुसऱ्याचं आयुष्य नका जगू (Don’t live someone else’s life)

प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, युनिक आहे. प्रत्येकांचा चेहरा वेगळा आहे, रंग वेगळा आहे, आवाज वेगळा आहे. प्रत्येक मनुष्य वेगळा आणि युनिक आहे. मग प्रत्येकला आपले स्वतंत्र विचार असू नये. म्हणून स्वतः विचार करा. थोडा वेळ स्वतः सोबत ही व्यतित करा. जाणून घ्या तुमच्या मधील स्टिव्ह जॉब्स ला.

स्टिव्ह म्हणतो.

Your time is limited so don’t west it leaving someone else’s life.

तुमचा वेळ हा खूप मर्यादित आहे, त्याला दुसऱ्याचा आयुष्या साठी नका खर्च करू. स्वतः साठी खर्च करा. तुमच्या जहाँजाचे तुम्हीच कॅप्टन बना. तुमच्या आयुष्याचं डिजाईन स्वतः तयार करा. तुम्हाला असे करण्या साठी दुसरी संधी अजिबात नाही मिळणार म्हणून एक तरी आता करा किंवा नंतर पश्चाताप करा. निवड तुमची आहे.

9) अनुकरण नका नेतृत्व करा ( innovation distinguishes between a leader and a follow.)

समाजात दोन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे लीडर आणि दुसरे त्यांचे फॉलोअर्स(अनुयायी). लीडरने जे केलं किंवा जे करायला सांगितलं ते करतात ते अनुयायी आणि जे नवीन गोष्टी करतात ते लीडर. जर तुम्ही कोणाचे अनुकरण करत असाल तर तुम्ही देखील एक अनुयायी आहात. म्हणून स्टिव्ह म्हणतो लिडर आणि अनुयायी यात नाविन्य एवढंच फरक असतो. कामात नाविन्य आणले तर तुम्ही लीडर बाकी सर्व तुमचे फॉलोअर्स बनतील. मग आज पासून अनुकरण सोडून नाविन्य शोधायला लागा.

10) stay hungry, Stay foolish

स्टिव्ह जॉब्स यांचा खूप च गाजलेला हा विचार आहे.

Stay hungry stay foolish

‘स्टे हंग्री स्टे फुलीश’ म्हणजे. कधीच संतुष्ट नका होऊ खास करून शिकण्याचा बाबतीत. आणि पूर्ण पाणे मूर्ख बना, जे गोष्ट लोक अशक्य असे ठेवतात ती गोष्ट शक्य करण्याची धडपड करणारा मूर्ख बना. असे स्टिव्ह जॉब्स म्हणतो. म्हणून मित्रानो माझा एक शेवटचा सल्ला

STAY HUNGRY STAY FOOLISH

संदर्भ:- http://bit.ly/2rHZPA4